Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सत्ता स्थापनेची कागदपत्रे राज्यपालांकडे सुरक्षित : फडणवीस

सत्ता स्थापनेची कागदपत्रे राज्यपालांकडे सुरक्षित : फडणवीस



नवी दिल्ली : खरा पंचनामा

आम्हाला सत्तास्थापनेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण होते. त्याची कागदपत्रे राजभवन कार्यालयाकडे नाहीत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे ती कागदपत्रे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. फडणवीस दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली येथे बैठक पार पडली. त्यानंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्तास्थापनेसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कोणतेही लेखी निमंत्रण नव्हते, अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागितलेल्या उत्तरात मिळाली आहे. यावर तुमचे काय मत आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला.

त्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राजभवन कार्यालयाने माहितीच्या अधिकारात उत्तर दिले आहे. सत्तास्थापनेबाबतची कागदपत्रे राज्यपाल यांच्याकडे आहेत. ही कागदपत्रे राजभवन कार्यालयाकडे नाहीत. न्यायालयात याची सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्याची कागदपत्रे सुरक्षितरित्या राज्यपाल यांच्याकडे ठेवण्यात आली आहेत, असे उत्तर राजभवन कार्यालयाने दिले आहे. आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण होते, असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने माहितीच्या अधिकाराखाली राजभवनकडून ही माहिती मागितली होती. त्यामुळे शिंदे- फडणवीस यांना सत्तेस्थापनेसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण नव्हते, असा दावा राजभवनकडून मिळालेल्या उत्तराच्या आधारावर करण्यात आला होता. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करुन या दाव्यावर पडदा पाडला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.