Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

करमुसे मारहाणीचा पुन्हा तपास करा : जितेंद्र आव्हाड यांना सुप्रीम झटका

करमुसे मारहाणीचा पुन्हा तपास करा : जितेंद्र आव्हाड यांना सुप्रीम झटका




नवी दिल्ली : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी न्यायालयाने मोठे निर्देश दिले आहेत. जितेंद्र आव्हाडांसाठी हा मोठा झटका आहे.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या संबंधी न्यायालयाने राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपासाचा अहवाल पुढील तीन महिन्यांत सादर करावे असेही निर्देश दिले आहेत.

याबाबत अनंत करमुसे म्हणाले, या प्रकरणात माझी पुन्हा तपास करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. तसेच या प्रकरणाचा पुन्हा तपास करुन राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. मागील सरकारने या प्रकरणात चुकीचा तपास केला असून त्याचा पुन्हा तपास करावा हीच तर माझी मागणी होती. तसेच आघाडी सरकारने केलेल्या चुका शिंदे फडणवीस सरकार सुधारेल आणि मला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे असंही करमुसे म्हणाले आहेत.

घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० मध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले होते. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.