Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्नावरून देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा

लग्नावरून देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा



मुंबई : खरा पंचनामा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्नावरून आदित्य ठाकरे यांना मिश्किल चिमटा काढला. बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, लग्न लावून देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुटलं तरी त्याची जबाबदारी ही सरकारची आहे, पण तुम्ही प्रश्न केला तो तपासून पाहिला जाईल. पण तुम्ही हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे बघून विचारला का, असा मिश्किल चिमटा फडणवीस यांनी काढला.

फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. सभागृहामध्ये आज आमदार बच्चू कडू यांनी कामगारांच्या लग्नावरून प्रश्न उपस्थितीत केला होता. 'आता आमच्या गावात मिल बंद झाली आहे. लग्न कामगारांनी केलं, ते तुटलं आहे. याची जबाबदारी कुणी घेणार आहे का? सरकारने काही तरी करावं, असं बच्चू कडू म्हणाले. 

त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे बोलायला उभे राहिले, त्यावेळी त्यांनी ही मिश्किल टिप्पणी केली. फडणवीस म्हणाले, 'कामाचं राहू द्या, लग्न लावण्याची जबाबदारी ही सरकार घ्यायला तयार आहे, असं फडणवीस म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही 'आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं' असं म्हणत चिमटा काढला. 'कोणाचंही तोंड कसं बंद करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न, हे मी अनुभवानतून बोलतो' असं फडणवीस म्हणताच सभागृहात पुन्हा एकच हशा पिकला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.