Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीसांचे नो पेंडन्सी ट्विट : सरकार पडणार?

फडणवीसांचे नो पेंडन्सी ट्विट : सरकार पडणार? 



मुंबई : खरा पंचनामा 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन फोटोंसह मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देऊन ट्विट केलं आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या या ट्विटमुळे राज्यातील सरकार पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

ट्विट केलेल्या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिग दिसत आहे. या फायलींवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस अत्यंत प्रसन्न मुद्रेत आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

फडणवीस यांच्या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर केव्हाही निकाल येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हा निकाल जाण्याची सर्वात अधिक शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या ट्विटला अधिक महत्त्व आलं आहे. 

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं विधान केलं आहे. त्यानंतर अवघ्या काही तासात फडणवीस यांनी हे ट्विट केलं आहे. अजितदादा भाजपसोबत येणार नाही. त्यामुळे कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर सरकार राहणार नाही. त्यामुळे फडणवीस फायली मार्गी लावत असल्याचं सांगितलं जात आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.