Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

40 टक्के काय भानगड आहे कळतच नाही!

40 टक्के काय भानगड आहे कळतच नाही!



बेळगाव : खरा पंचनामा

कर्नाटकात 40 टक्क्यांचं सरकार आहे असं म्हटलं जातं, ही 40 टक्के भानगड काय असते हे काही कळेना अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली आहे. मणिपूरसारखं लहान राज्य भाजप सरकारला सांभाळता येईना. बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी भाजपवर टीका केली.

पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं. त्यानंतर आम्ही उत्तम पाटील यांना निपाणीमधून संधी दिली.

शरद पवार म्हणाले की, धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात, त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. ही 40 टक्के काय भानगड आहे हे कळेना. कर्नाटकची आजवर इतकी बदनामी कुणीही केली नाही जितकी भाजप सरकारने केली आहे. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते. पण तसं कर्नाटकात झाल्याचं दिसत नाही. ज्यांच्या हातात देश आहे त्यांना मणिपूर सारखं राज्य सांभाळता येत नाही. मणिपूर कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे, इथले काही लोक त्याला अशुभ दिवस म्हणत आहेत.

शरद पवार म्हणाले की, माझ्याकडे 10 वर्षे कृषी खातं होतं, 72 हजार कोटी कर्जमाफी केली, व्याजाचे दर 3 टक्क्यांवर आले. उत्तम पाटील यांना निवडून द्या, इथल्या उसाला दर वाढवून देण्याबाबत मार्गदर्शन करू, असेही पवार यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.