लोकशाही, लोकमताचा विजय झाला : देवेंद्र फडणवीस
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयावर आम्ही पूर्णपणे समाधानी आहे. या निर्णयाने लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाला आज लागला. सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या संदर्भात जो निकाल दिला आहे त्याबाबत आम्ही पुर्णपणे समाधान व्यक करतो. आणि या निर्णयाने निश्चितपणे लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे. त्यांनी सांगितले की, सर्वात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या मनसुभ्यावर पाणी फेरले गेलं. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बोलवता येणार नाही अस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.