Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

म्हणून कॅटने परमबीर सिंहबाबत एकतर्फी निर्णय घेतला : अनिल देशमुख

म्हणून कॅटने परमबीर सिंहबाबत एकतर्फी निर्णय घेतला : अनिल देशमुख



नागपूर : खरा पंचनामा

बक्षिशी म्हणून परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. कॅटनं तीन वेळा राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्याची मागणी केली, मात्र राज्य सरकारनं अहवाल सादर केला नाही. त्यामुळेच कॅटनं एकतर्फी निर्णय घेतला असा गंभीर आरोप देखील अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केला.

राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांचे निलंबन नुकतेच मागे घेतले आहे. कॅटने वारंवार राज्य सरकारला त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी अहवाल मागीतला होता. अहवाल न दिल्याने कॅटने एकतर्फी निर्णय घेत त्याचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्य सरकारने कॅटला अहवाल का दिला नाही असा प्रश्न उपस्थीत करीत परमबिर सिंग याचे निलंबन रद्द करण्याचा आदेश बेकायदेशीर व आरोपीला संरक्षण देणारा असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे विरोधात राज्यातील वेगवेगळया पोलिस ठाण्यांमध्ये किमान 8 ते 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, कायदयाचा दुरुपयोग या सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. उदयोगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जे जिलेटीन ठेवण्यात आले त्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा परमबीर सिंह असल्याचा खळबळजनक दावा देखील देखमुख यांनी केला आहे.

गृहमंत्री पदी असताना मी त्यांची खालच्या पदावर बदली केली. तसेच या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या एनआयएने कोर्टात जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात देखील परमबीर सिंह यांचा या प्रकरणात मुख्य रोल होता असे नमुद केले आहे. अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदिप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाने परमबिर सिंग यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असतांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना संरक्षण का देण्यात येत आहे असे ताशेरे सुध्दा देशमुख यांनी ओढले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.