म्हणून परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप महाराष्ट्र सरकारने मागे घेतले आहेत. एवढेच नाही तर डिसेंबर २०२१ मध्ये दिलेले निलंबनाचे आदेशही राज्य सरकारने रद्द केले आहेत. निलंबनाच्या वेळी ते ऑन ड्युटी होते असे गृहीत धरावे, असेही राज्य सरकारेन म्हटले आहे.
याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांचे निलंबन देखील कॅटने रद्द केले आहे. आम्ही फक्त या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.
परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये सिंह यांना निलंबितही करण्यात आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.