Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निकालापूर्वीच नरहरी झिरवळ यांनी केला मोठा गौप्यस्फोट!

निकालापूर्वीच नरहरी झिरवळ यांनी केला मोठा गौप्यस्फोट!



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांना अपात्र का करू नये? असं नव्हतं तर त्या 16 आमदारांना अपात्र केलं होतं, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत. 'मी सर्व बाजूंनी अभ्यास करून निर्णय घेतला, असेही त्यांनी म्हटले आहे.

घटनेचा, सभागृहाचा, पक्षाच्या गटाचा, कोणाचे अधिकार कुणाला आहेत? याबाबत अभ्यास करूनच 16 आमदारांना अपात्र केलं होतं', असं ते म्हणाले आहेत. न्यायालय 16 लोकांना अपात्र केलं आहे, ते योग्य आहे असाच निर्णय देऊ शकतं, असं झिरवळ यांना वाटत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने परत हा मुद्दा विधिमंडळाकडे पाठवला तर तत्कालिन अध्यक्ष म्हणून ते माझ्याकडेच येईल, असा विश्वास झिरवळ यांनी व्यक्त केला. माझ्यावरचा अविश्वास रितसर नव्हताच, तर त्यावर कारवाई काय होईल? रितसर असता तर तो मांडावा लागतो, त्याचं संख्याबळ दाखवावं लागतं. योग्य पद्धतीने त्याची मांडणीच झाली नव्हती, त्यामुळे अविश्वास यायचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली.

'मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्रक्रिया सुरू होताना नार्वेकर साहेब सभागृहात नव्हते, मी निर्णय दिला त्यावेळी नार्वेकर साहेब नव्हते. अजूनही मी त्या जागेवर आहे, त्यामुळे निर्णय माझ्याकडेच येईल. जो निर्णय दिलाय तो मी दिलाय, त्यामुळे माझ्याकडेच निर्णय येईल,' असं विधान नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.