Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटकातील काँग्रेसचा विजय भारत जोडो यात्रेमुळे : राज ठाकरे

कर्नाटकातील काँग्रेसचा विजय भारत जोडो यात्रेमुळे : राज ठाकरे



मुंबई : खरा पंचनामा

कर्नाटकातील हा विजय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या कर्नाटक विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

सोबतच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं देखील कौतुक केलं आहे. विरोधी पक्ष कधी जिंकत नाही सत्ताधारी हरत असतात. पराभव हा स्वभावाचा पराभव आहे. आपलं कोणीच वाकड करू शकत नाही असं मानणाऱ्यांचा हा पराभव आहे.

लोकांना कधीही गृहीत धरू नये, या निकालांमधून सगळ्यांनी बोध घेण्यासारखा आहे. कर्नाटकातील हा विजय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

यावेळी त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यात आला होता असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. यावरून राज ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. पहाटेचा शपथविधी ही तुमची चूक होती, ती चूक झाली आहे. उगाच कोणाला धडा शिकवायला जाऊ नका, आता सारवासारव करण्यात काही अर्थ नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.