Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना मिळणार नारळ?

शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना मिळणार नारळ?



मुंबई : खरा पंचनामा

सध्याच्या मंत्रिमंडळात समाधानकारक काम न करणाऱ्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना 'नारळ ' देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच या पाचही मंत्र्यांच्या जागी नवीन लोकांना संधी देण्याचे देखील आदेशात म्हटले आहे. 

या 5 जणांमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पाहायला मिळत आहे. यासाठी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका देखील झाल्या असल्याची चर्चा आहे. असे असताना सद्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील नेते नाखूष असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना मंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी इतर आमदारांची निवड करण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.

शिंदे गटातील पाच मंत्र्यांना हटवण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवेळी आपल्याला साथ देणाऱ्या लोकांना आता मंत्रीपदावरून कसे हटवावे असा प्रश्न शिंदे यांना पडला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे तीन दिवस काश्मीर दौऱ्यावर गेल्याचे बोलले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.