Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शपथविधीबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले पत्र समोर आणा!

शपथविधीबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले पत्र समोर आणा!



मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी रविवारी राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीसोबत झालेला शपथविधी एकनाथ शिंदेंना अंधारात ठेऊन केला गेला असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रोटोकॉलप्रमाणे राज्यपालांना पत्र दिलं होतं का? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील करुन घेताना त्यांना मंत्रिपदं किती द्यायची, किती महामंडळं द्यायची याविषयी झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यांना सामावून घेतलं की नाही? अशी शंका वाटत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. 

राष्ट्रवादीचे आमदार मंत्रीपदाची शपथ घ्यायला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांना पत्र दिलं होतं का? ते सुद्धा बाहेर आलं पाहिजे", अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. वैधानिक पद्धतीनुसार ज्या मंत्र्यांना शपथ द्यायची असते त्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना देणं बंधनकारक असतं, असंही जाधवांनी म्हंटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.