पूर्वी माणसे फोडली जायची, आता पक्षच फोडले जातात!
आष्टा : खरा पंचनामा
पूर्वी माणसे फोडली जात होती. मात्र आता पक्ष फोडले जात आहेत. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे पक्ष फोडले. यातून राज्यातील, देशातील जनतेला वेगळ्या लोकशाहीचे दर्शन होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली.
फार्णेवाडी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आ. पाटील बोलत होते. आ. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील मोठा पक्ष म्हणून पुढे येत असताना पक्षात दुफळी झाली. आपण पक्ष एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या विधानसभा निवडणुकीत 'एक व्होट, एक नोट' देणाऱ्या फार्णेवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.