Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कानशिलात मारु म्हणाऱ्याना सभेतुन बाहेर जाऊ देणार नाही!

कानशिलात मारु म्हणाऱ्याना सभेतुन बाहेर जाऊ देणार नाही!



इचलकरंजी : खरा पंचनामा

हे सरकार आमचं आहे. शेतक-यांचे आहे. सर्वांचे आहे. गोरगरीबांचे आहे. पळणार सरकार आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहे. परंतु कोणी जर कानशिलात लगावण्याची भाषा करणार असाल तर सभेतून बाहेर जाऊ देणार नाही असा सज्जड इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिला.

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रकाश आवाडे बोलत होते. त्यावेळी आवाडे यांनी शेट्टींच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणालेतोंडाला लगाम घाला, आपण काय बोलतोय याचं भान ठेवून बोला.

उसाचा दुसरा हप्तात चारशे रुपये देण्यावरून स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने काढलेल्या मोर्चा वेळी प्रसंगी कारखानदारांच्या कानशिलात ओढू असं राजू शेट्टी यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर कानशिलात लगावण्याची भाषा करणारे सभेतून बाहेर जाऊ शकणार नाहीत असा सज्जड दम आमदार आवाडे यांनी त्यांच्या भाषणातून दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.