Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आपण एका ताटात जेवलोय.. संभल के रहो...

आपण एका ताटात जेवलोय.. संभल के रहो...



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करतानाच भाजप हा पक्ष विश्वासू नाहीये. त्यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही दगाबाजी केली. आता अजितदादा गटाने सांभाळून राहिलं पाहिजे, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस फसवत आहेत. हे मनोज जरांगे पाटील म्हणाले ते बरोबर आहे. पाटलांना जसा फडणवीस यांनी दगाफटका केला तसा सर्वांनाच केला आहे. या राज्यातील महिलांशीही दगा फटका केला आहे. राज्यात महिला सुरक्षित कुठे आहेत? त्यांनी इतर समाजांनाही धोका दिला. त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ते सातत्याने खोटं बोलत आहेत.

एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेतून घेऊ असं फडणवीस म्हणाले. म्हणजे शिंदे अपात्र होणार आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणजे शिंदेंना दगाफटका केला ना? यांना जर शिंदे अपात्र होणार हे माहीत होतं तर मग उद्धव ठाकरेंचा पक्ष का फोडला? उद्धव ठाकरेंशी दगाफटका केला? उद्धव ठाकरेंशी दगाफटका केलाच पण घटक पक्षाशीहा दगाफटका केला. अजित पवार गटाला विनम्र विनंती आहे, कधी तरी एका ताटात आपण जेवलोय. ते शिंदेंना धोका देत आहेत. त्यामुळे संभल के रहो, इस भाजप से, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.