Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'चर्चा जरी फिस्कटली असली तरी...'

'चर्चा जरी फिस्कटली असली तरी...'



कोल्हापूर : खरा पंचनामा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरची वेळ दिली आहे. 24 तारखेला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

त्यापूर्वी हालचालींना वेग आला असून, गुरुवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र या चर्चेत आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाहीये. यावर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कालची चर्चा फिस्कटली असली तरी आम्ही पुन्हा चर्चा करू, शासन आपले प्रयत्न सोडणार नाही व मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे कुणबी दाखले मराठ्यांना मिळाले आहेत. त्यामुळे दोघांनी हे प्रकरण जास्त न ताणता दोन्ही समाजाचे कसं भलं होईल हे पहावं. जरांगेंच्या मागणी संदर्भात शासनाचं शिष्टमंडळ दुसऱ्यांदा त्यांच्याकडे गेलं. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्या संदर्भात शासकीय अडचणी बाबत चर्चा झाली. त्या संदर्भात लवकरच तोडगा निघेल असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.