आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांच्या दारात फिरकू नका : जरांगे पाटील
धुळे : खरा पंचनामा
मराठा समाजातील आमच्या बापजाद्यांनी महाराष्ट्रात अनेक नेत्यांना मोठे केले. या नेत्यांची मुले भय्यासाहेब बनवून श्रीमंत झाली. पण आमचा मुलगा आजही उसाच्या शेतात राबतो. नेत्यांच्या मागे जाणार नाही, अशी भूमिका घेण्याचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता, धनगर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हानदेखील त्यांनी दिले.
धुळ्यातील जेलरोड येथे मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी असताना मृत झालेले राजाराम वालजी पाटील यांच्या परिवाराला एक लाखाच्या मदतीचा धनादेश धुळ्याच्या सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी पाटील यांचे चिरंजीव अभिनय पाटील यांनी बोलताना, आपण वडिलांच्या बलिदानापासून प्रेरणा घेतली असून, पुढील काळात समाजासाठी तन, मन, धन अर्पण करणार असल्याचे सांगितले. या वाक्याचा धागा पकडत मनोज जरांगे-पाटील यांनी, मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी बळी दिला आहे. अजून सरकार किती बळींची वाट पाहात आहेत, असा सवाल केला. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांना पाटील परिवारासंदर्भात माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.