Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ये डर अच्छा है!'

'ये डर अच्छा है!'



मुंबई : खरा पंचनामा

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या लोकांना भाजप घाबरतं त्याच्यावर घाणेरडे आरोप केले जातात, त्यांना बदनाम केलं जातं. ज्यांच्या बद्दल त्यांच्या मनात भीती आहे त्यांना असेच सतावले आणि बदनाम केले जाते. मीच नाही अशी अनेक लोकं आहेत. देशात विरोधी पक्षातील अनेक लोकांवर आरोप केले जातात.

पण ज्याच्यावर दाऊदचे पार्टनर आहेत, सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला असे आरोप केले जातात, ते सोबत आल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री, मंत्री करतात. ही भाजपची स्टॅटर्जी आहे. ये डर अच्छा है, ज्यांना घाबरतात त्यांच्यावर असे आरोप करतात असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्रात बदनामी करण्यासाठी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुन्हा उघडले जात असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण त्यांच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्या पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.