Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर २१ वर्षांनंतर राज्य उत्पादन शुल्कची पुनर्रचना; १६५५ पदे वाढली नेत्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची मक्तेदारी येणार संपुष्टात

अखेर २१ वर्षांनंतर राज्य उत्पादन शुल्कची पुनर्रचना; १६५५ पदे वाढली
नेत्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची मक्तेदारी येणार संपुष्टात



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्याला हजारो रूपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तब्बल २१ वर्षांनंतर पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश आज मंगळवारी राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने काढण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या बळकटीकरणासाठी केलेल्या या पुनरर्चनेत कार्यकारी आणि अकार्यकारी मिळून तब्बल १६५५ पदांची वाढ झाली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गेली वीस वर्षे ज्या अधिकाऱ्यांची मक्तेदारी या विभागात होती ती संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा आहे. उत्पादन शुल्कची पुनरर्चनेचा निणर्य झाल्याने आता सार्वत्रिक बदल्यांच्या कामाला वेग येईल असे या विभागातील सूत्रांनी सांगितले. या पुनर्रचनेमुळे या विभागात नव्याने भरती होण्याची शक्यता वाढल्याने राज्य शासनाच्या या निर्णयाचे तरूणांकडून स्वागत केले जात आहे. 

राज्य शासनाला राज्य उत्पादन शुल्ककडून हजारो कोटी रूपयांचा महसूल मिळतो. त्यामुळे पोलिस आणि महसूलनंतर क्रीम पोस्टिंगसाठी हा विभागही तितकाच प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार स्वजिल्हा आणि तीन वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या. राज्य शासन महसूल वाढीसाठी प्रयत्नशील असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुनर्रचना करून त्या विभागाचे बळकटीकरण करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यामध्ये लायसेन्सीच्या (परवानाधारक) संख्याबळावर निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या हद्द निश्चित करण्यात आली आहे. 

उत्पादन शुल्कच्या नव्याने करण्यात आलेल्या पुनर्रचनेत ४६ घटकांसह ८०९ कार्यकारी पदांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय आता विभागीय उपायुक्त कायार्लयात प्रत्येकी एक यानुसार उपअधीक्षक पदांची संख्या ८ ने वाढली आहे. तसेच ८०० लायसेन्सीसाठी एक उपअधीक्षक यानुसार १८ उपअधीक्षक पदे अधीक्षक कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. जिल्हा भरारी पथकामध्ये ३ तर विभागीय भरारी पथकांमध्ये ४, राज्यस्तरीय भरारी पथकांमध्ये १४ पदे वाढवण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय ९ भरारी पथके वाढवण्यात आली आहेत. सर्व भरारी पथकांमध्ये २४० पदांची वाढ करण्यात आली आहे. राज्यस्तरीय भरारी पथकात उपअधीक्षकांचे एक पद नव्याने निमार्ण करण्यात आले आहे. 

राज्यांच्या सीमांवर असलेले तपासणी नाक्यांमध्ये १३ ने वाढ करून एकूण २५ तपासणी नाके आता कार्यरत राहणार आहेत. सुधारित आकृतीबंधाच्या पुनर्रचनेनुसार राज्यात १६५५ पदे वाढवण्यात आली आहेत. याशिवाय वर्ग एक आणि दोन तसेच त्यावरील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदांची संख्या ७६ वर गेली आहे. २००३ च्या आकृतीबंधानुसार ही संख्या २४ होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.