Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोयीच्या बदलीसाठी मंत्रालयात गर्दी! अधिकाऱ्यांच्या बदल्या १६ पर्यंत करण्याचे निर्देश

सोयीच्या बदलीसाठी मंत्रालयात गर्दी! 
अधिकाऱ्यांच्या बदल्या १६ पर्यंत करण्याचे निर्देश



मुंबई : खरा पंचनामा


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपासून मंत्रालयात बदल्यांचा धडाका सुरू आहे. येत्या १६ तारखेपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी सर्व विभागांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील विविध विभागात बदल्यांसाठी धावपळ सुरू आहे. बदल्यांवरून मंत्र्यांमधील मतभेदही यानिमित्त चर्चेत आले आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना केल्या आहेत. निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी संबंधित जिल्ह्यात सेवा कार्यकाळ पूर्ण केलेल्या तसेच जिल्ह्यात नोकरी करत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. याच धोरणानुसार राज्यात बदल्यांचा धडाका सुरू आहे. विद्यमान सरकारच्या काळातील या अंतिम बदल्या असणार आहेत.

महसूल, पोलिस खात्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. त्याचबरोबर आता जलसंपदा, आरोग्य, ग्रामविकास, वनविभाग, सहकार आदी विभागांतील बदल्याही केल्या जाणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मंत्रालयात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. बहुतांश गर्दी ही बदली आणि विकासकामांच्या मंजुरीसाठी झाली असल्याचे दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.