Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"त्यांना आमचा गुण लागलाय"

"त्यांना आमचा गुण लागलाय"



मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने कोणतीही चूक केलेली नाही. अजित पवार यांना सोबत घेणे ही काळाची गरज होती. राजकारणात काळाची गरज असताना हाती आलेली संधी सोडायची नसते. अजितदादांबाबत घेतलेली संधी सेटल व्हायला वेळ लागेल. पण एका वातावरण स्थिर झाले की ही संधी घेतल्याचा फायदा आम्हाला मिळेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस  यांनी केले. ते शुक्रवारी 'टीव्ही ९ मराठी' कॉनक्लेच्या व्यासपीठावरुन बोलत होते.

यावेळी अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. अजितदादांसोबत युती करुन आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची मतं भाजपला ट्रान्सफर झाली नाहीत, ही खरी गोष्ट आहे. पण त्यावेळी अजित पवार यांचा पक्ष नवीन होता. त्यांचीच मतं सेटल होणे गरजेचे होते. त्यामुळे लोकसभेला त्यांना त्यांची मतं भाजपला ट्रान्सफर करता आली नाहीत. पण विधानसभा निवडणुकीत तसं घडणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अजित पवार गुलाबी झाले पण ते भगवे झाले नाहीत, या राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले होते. तुम्ही अजितदादांना 40 वर्षांपासून राजकारणात पाहताय. तुम्ही अजितदादांना अशा गोष्टी करताना पाहिले होते का? ते आमच्यासोबत राहिले की त्यांना आमचे काही गुण लागणारच ना? तुम्ही काळजी करु नका. त्यांना हळूहळू आमचे सर्व गुण लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.