Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आम्हाला राजकारणात यायचे नाही परंतु..."

"आम्हाला राजकारणात यायचे नाही परंतु..."



बीड : खरा पंचनामा

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाज करत आहे. परंतु, न मागितलेले आणि अनेकदा न्यायालयात न टिकलेले आरक्षण देऊन सरकार मराठा समाजाच्या मूळ मागणीला वंचित ठेवत समाजाची दिशाभूल करत आहे. आम्हाला राजकारणात् यायचे नाही परंतु, निवडणुकीपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोणत्या पक्षाचे उमेदवार पाडायचे याचा निर्णय घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.

आष्टी मतदारसंघातील पिंपळवंडी येथे शुक्रवारी (ता. १४) घोंगडी बैठकीदरम्यान जरांगे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी अनेक दिवसांपासून घोंगडी बैठका घेत आहे. परंतु, आष्टी मतदारसंघाच्या घोंगडी बैठकीने सर्व घोंगडी बैठकांचे रेकॉर्ड तोडले आहेत.

आपल्या लेकरांसाठी एकत्र या. एकजुट तुटू देऊ नका. मी शेवटच्या क्षणापर्यंत जीवघेणा संघर्षकरून तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही. आपल्याला आरक्षण मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आपण रात्रंदिवस कष्ट करायचे लेकरांना शिकवायचे. परंतु, आरक्षणामुळे आपल्या लेकरांचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंग पावत आहे. आरक्षणावर अनेक जाती मोठ्या झाल्या आणि मराठा जात आरक्षणाअभावी मागे पडत गेली. मला मराठा जात मोठी करण्याचे वेध लागले आहेत. परंतु, ताकदवान व श्रीमंत पुढारी मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.