Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची शरद पवारांना नोटीसदंगलीवेळी उद्धव ठाकरेंना पत्र लिहल्याचा दावा !

भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची शरद पवारांना नोटीस
दंगलीवेळी उद्धव ठाकरेंना पत्र लिहल्याचा दावा !

मुंबई : खरा पंचनामा

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार, पवार यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत त्यांच्याकडील कागदपत्रे आणि पुरावे आयोगासमोर सादर करावेत किंवा स्वतः अथवा वकिलांमार्फत हजर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे की, शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते, ज्यात भीमा कोरेगाव येथील दंगल ही 'घडवून आणलेली' असल्याचा उल्लेख आहे. आंबेडकर यांनी हे पत्र आयोगाच्या रेकॉर्डवर आणण्याची मागणी केली होती. आयोगाने ही मागणी मान्य करत पवार यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. आंबेडकर यांच्या मते, हे पत्र आयोगासमोर आल्यास दंगलीमागील सत्य समोर येईल आणि आयोगाला योग्य शिफारशी करणे सोपे होईल.

आंबेडकर यांच्या विनंतीनुसार, आयोगाने शरद पवार यांना त्यांच्याकडील पत्र आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. आंबेडकर यांचे वकील ऍड. किरण कदम यांनी याबाबत आयोगाला विनंती केली होती, ज्याला आयोगाने मान्यता दिली. जर पवार यांनी हे पत्र सादर केले, तर त्याआधारे आयोग पुढील कारवाईचा निर्णय घेईल, ज्यात पवार यांना साक्षीसाठी बोलवण्याचा समावेश असू शकतो.

आयोगाने शरद पवार यांना ३० एप्रिलपर्यंत त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे. पवार यांनी स्वतः हजर राहावे किंवा वकिलांमार्फत कागदपत्रे सादर करावीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या नोटीसीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवार यांच्याकडून येत्या काही दिवसांत याबाबत प्रतिसाद अपेक्षित आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.